श्री स्वामी समर्थ चरित्र पोथीचे पारायण कसे करावे ?
"श्री स्वामी चरित्र सारामृत" या ग्रंथाचे पारायण श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने केले जाते. पारायणामुळे मनःशांती, आत्मविश्वास आणि स्वामींची कृपा लाभते, अशी भक्तांची श्रद्धा आहे...
पारायण सुरू करण्यापूर्वी
- सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
- देवघरात श्री स्वामी समर्थ यांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी.
- दीप, अगरबत्ती व फुले अर्पण करावीत.
- "ॐ श्री स्वामी समर्थ" मंत्राचा ११, २१ किंवा १०८ वेळा जप करावा.
संकल्प करावा – आपल्या इच्छित कार्यसिद्धीसाठी किंवा स्वामी कृपेसाठी पारायण करीत असल्याचे मनोमन सांगावे..
साथ दिवसांचे पारायण :
- दिवस १: अध्याय १ ते ७
- दिवस २: अध्याय ८ ते १४
- दिवस ३: अध्याय १५ ते २१
- दिवस ४: अध्याय २२ ते २८
- दिवस ५: अध्याय २९ ते ३५
- दिवस ६: अध्याय ३६ ते ४२
- दिवस ७: उर्वरित अध्याय व समारोप... (ग्रंथाच्या आवृत्तीनुसार अध्यायसंख्या थोडी बदलू शकते.) परायनदारम्यान :
- शक्यतो एकाच वेळेला व एकाच ठिकाणी वाचन करावे.
- सात्त्विक आहार घ्यावा.
- वाचन पूर्ण झाल्यावर "ॐ श्री स्वामी समर्थ" नामस्मरण करावे.
- स्वामींची आरती म्हणावी.
पारायण समाप्ती :
- नैवेद्य दाखवावा (खडीसाखर, दूध, फळे किंवा पेढे).
- आरती करावी.
-
स्वामी समर्थांचा जयघोष करावा:
"अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय!" - प्रसाद वाटावा...

0 टिप्पण्या